बॉस १४ ची विजेती ठरलेली रूबीना कोण आहे?

राहुल वैद्य, निक्की तांबोळीला हरवत  रुबीना दिलैक बिग बॉस १४ ची विजेती ठरली आहे या विजयाबरोबरच तिला बक्षीसाची रक्कम म्हणून 36 लाख रुपयेही मिळाले आहेत. रूबीनाव्यतिरिक्त राहुल वैद्य, राखी सावंत, निक्की तांबोळी आणि अली गोनी हे पण बिग बॉसच्या फायनलपर्यंत पोहोचले होते गायक राहुल वैद्य फर्स्ट रनर अप ठरला. पाच फायनलिस्टपैकी राहुल, राखी आणि निक्की हे तीन फायनलिस्ट मराठी होते.गायक राहुल वैद्य या आधी  इंडियन आयडॉल या गाण्याच्या रिअलिटी शोमध्ये उपविजेता ठरला होता.

फायनलपर्यंत पोहोचलेल्या सर्व स्पर्धकांना 14 लाख रुपये घेऊन कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा पर्याय कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सलमान खाननं दिला होता त्यसाठी स्पर्धकांना अवघा 30 सेकंदांचा वेळ दिला गेला.  राखी सावंत हिने 14 लाख रुपये घेऊन शो सोडण्याचा निर्णय घेतला. कमी व्होट मिळाल्यामुळे अली गोनीही स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. निक्की तांबोळीलाही नंतर बाहेर पडावं लागलं आणि शेवटी रुबीना आणि राहुलच उरले होते निक्की आणि राहुल या दोन मराठी स्पर्धकांना हरवत रुबीना बिग बॉस 14 ची विजेती ठरली


रुबीना  आणि  राखी सावंतसोबतचा वाद

काही दिवसांपूर्वी रूबीना बिग बॉसच्या घरातील स्पर्धक राखी सावंतसोबतच्या कडाक्याच्या भांडणामुळे चर्चेत आली होती .रुबीना दिलैकच्या रागाचं कारण  राखी रुबीना  दिलैकचा पती अभिनव शुक्लासोबतचं वर्तन हे होतं. बिग बॉस’च्या चौदाव्या सीझनमध्ये राखी सावंत वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे घरात आली होती तर अभिनव आणि रुबीना स्पर्धक म्हणून घरात आले होते.

घरात आल्यानंतर राखीने अभिनव शुक्लासोबत ‘फ्लर्ट’ करायला सुरूवात केली. सुरूवातीला हे सगळं गमतीत आणि हसत-खेळत सुरू होतं मात्र एकदा राखीने लिपस्टिकने आपल्या अंगभर ‘I love ABhinav’ लिहिलं आणि घरभर फिरत होती. आपल्याला अभिनव आवडतो असंही ती सातत्यानं सांगायला लागली.

एका टास्कदरम्यान राखी सावंतने अभिनवच्या शॉर्ट्सची नाडीच ओढली.. इतकंच नाही एका टास्कमध्ये मदत केली नाही, म्हणून घरात जाऊन राखीने अभिनवची अंतर्वस्त्रच कात्रीने कापली. हा प्रकार अभिनव आणि रूबीनाला आवडला नव्हता.राखीच्या या वर्तनामुळे रुबीनाने ‘एन्टरटेन्मेंटच्या नावाखाली असं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही. एका मर्यादेत राहणं चांगलं’ असं तिला बजावलं होतं. एकदा तिने राखीच्या अंगावर पाणीही फेकलं होतं.सोशल मीडियावर या घटनांनंतर रुबीनाला समर्थन मिळालं होतं, तर राखी सावंतला  ट्रोल व्हावं लागलं होतं.


रूबीना आणि अभिनव यांच्या लग्नाबद्दलचा गौप्यस्फोट ?

 

अभिनव आणि आपलं नातं घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचलं होतं, आपल्या लग्नात तणाव होते. असं रुबीनानं म्हटलं होतं रूबीनानं आपल्या लग्नाबद्दल केलेल्या खुलाशानंतरही खळबळ उडाली होती.. आपल्या नात्याला एक संधी देण्याच्या विचारानंच आपण बिग बॉसमध्ये आल्याचंही रुबीना आणि अभिनवनं स्पष्ट केलें. त्यांच्या या खुलाशावर घरातील अनेक स्पर्धकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. रूबीना केवळ लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी हे सांगत आहे, असंही काही स्पर्धकांनी म्हटलं होतं.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिनव शुक्लानं माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आता आपल्या नात्यात सगळं सुरळीत असल्याचं म्हटलं. आता घटस्फोटाचं कसलाही विचार नसल्याचं आणि आम्ही ‘कपल’ म्हणून अधिक स्ट्राँग झालो आहोत असे त्यानं म्हटलं.

कोण आहे रुबीना दिलैक?

रूबीनानं 2008 साली झी टीव्हीवरील ‘छोटी बहू’ या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि ती मूळची शिमल्याची आहे. त्यानंतर तिने देवों के देव महादेव,  सास बिना ससुराल, पुनर्विवाह  या मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.

 

कलर्स वाहिनीवरील ‘शक्ती- अस्तित्त्व के एहसास की’ या मालिकेत 2016 साली रूबीनानं मूळ भूमिका निभावलेली. 2018 साली रूबीना अभिनेता अभिनव शुक्लासोबत विवाहबद्ध झाली होती.

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts