वास्तुशास्त्रानुसार सायंकाळीं ‘ही’ कामे चुकूनही करू नका. अन्यथा पडेल महागात.

वास्तुशास्त्रात घरात सकारात्मक वातावरण असणे खुप गरजेचे आहे. काही गोष्टी करणे कठीण असल्या तरी काही गोष्टी करणे आपल्या हातात असतात. कुटुंबाच्या भल्यासाठी, विकासासाठी वास्तुच्या सिद्धांतांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. घराचे बांधकाम करताना जरी तुम्ही सर्व दिशा, दशा नीट केल्या असतील तरी घरा बांधल्यानंतरचे काही नियम न पाळल्यास कंगालीकडे वाटचाल होऊ शकते. सायंकाळच्या वेळी काही गोष्टी केल्या तर त्याचे दुष्परिणाम होतात, असे सांगतिले जाते. सायंकाळच्या वेळी ही पाच कामे केली तर त्या घराला वास्तुदोषाने घेरले जाते. सायंकाळच्या या चुका घराती आर्थिक संपन्नतेला बाधा पोहोचवितात. वास्तुशास्त्रानुसार सुर्यास्तानंतर ही कामे न करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर नक्कीच हा लेख तुमच्या कामात येईल. चला तर बघुयात अशी कामे जी सायंकाळी वास्तूशास्त्र या कामांना विरोध करतो. 

 

पैशाची देवाणघेवाण करू नये

 

खरंतर, वास्तुशास्त्रानुसार सायंकाळच्या वेळी म्हणजे सुर्यास्तानंतर पैशांची देवाण-घेवाण न करण्याचा सल्ला दिला दातो. सुर्यास्तानंतर कोणाला उधारीवर पैसे देऊ नका, कोणाला उधार पैसे देऊ नका. असे म्हटले जाते की, सायंकाळी दिलेले पैसे परत तुम्हाला मिळत नाहीत. तसेच या काळात घेतलेल्या कर्जाचा बोजादेखील कधी उतरत नाही. सोबतच उंबर्यावर उभे राहून कधीही पैसे देऊ नये. घराच्या आत पैश्याची देवाण घेवाण करावी. शिवाय मंगळवारी कुणालाही कर्ज सुद्धा देऊ नये. कारण ते पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते. 

 

तुळशीची पाने तोडू नये

 

असे सांगितले जाते की सायंकाळी सगळी झाडे झोपलेली असतात. तुळशी सुद्धा. त्यामुळे तुळशीची पूजा सायंकाळी केली जात नाही. सोबतच तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असतो. म्हणुन तिला विष्णूप्रिया असेही संबोधले जाते. यामुळे सायंकाळी कधीही तुळशीची पाने तोडू नये. असे केल्याने भगवान विष्णु नाराज होतात. सायंकाळच्या वेळी तुळशीची पाने तोडल्यास रोग आणि आर्थिक समस्यांनी त्या व्यक्तीला घेरले जाते. त्याऐवजी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावण्यास सांगितले जाते. युपाच्या दिव्याने परिसरातील वातावरण शुध्द केले जाते.

 

सायंकाळी झाडू मारू नये

 

वास्तू शास्त्रानुसार सायंकाळी सर्व देवी देवता घरी येत असतात. त्यामुळे सुर्यास्तानंतर घरात कधीही झाडू मारू नये. कारण हा त्यांचा झालेला अपमान असतो. यामुळे लक्ष्मीदेखील नाराज होते. सोबतच आर्थिक संकट तयार होते. जर कोणत्या कारणाने घरात झाडू मारावी लागली तर एकत्र केलेला कचरा घरातून बाहेर फेकू नये. तो गोळा करून ठेवावा, दुसऱ्या दिवशी सुर्योदयानंतर घरातून बाहेर टाकावा.

 

दारं खिडक्या उघडे ठेवल्यास

 

खरंतर सायंकाळी दारं, खिडक्या उघडे ठेवण्याची प्रथा, परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. याचे कारण देखील विशेष आहे. परंतू काही लोकं तिन्हीसांजेला घरात मच्छर, कीटक येतात म्हणून अनेकजण दरवाजा बंद ठेवतात. परंतू, या काळात घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवू नये असे सांगितले जाते. लक्ष्मी घरात येण्याचा हा वेळ असतो. यामुळे दरवाजा बंद असेल तर लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. शिवाय असे केल्यास त्या घरी सकारात्मक वातावरण देखील कायम राहत नाही. त्यामुळे घरातील हवा खेळती असावी. 

 

या व्यक्तींना खाली हाताने पाठवू नका. 

 

वास्तू शास्त्रानुसार सूर्यास्त झाल्यानंतर घरात कधीही भांडणे करू नयेत. यामुळे लक्ष्मी माता नाराज होते. यामुळे कंगाली, गरीबी घेरण्यास सुरुवात करते. तसेच सायंकाळच्या वेळी कोणी गरीब व्यक्ती दारावर आला तर त्याला रिकाम्या हाताने माघारी पाठवू नये. आपल्या ऐपतीनुसार काही ना काही अवश्य द्यावे. शक्य असल्यास दारी आलेल्या एखाद्या वृध्द भिकाऱ्याला किंवा अपंगाला जेवण द्यावे.

 

हे पदार्थ इतरांना देऊ नका 

 

सोबतच सायंकाळी कोणालाही दूध, दही, मीठ, साखर किंवा पांढरे पदार्थ देऊ नका याचे कारण असे की आपल्या कुंडलीतले शुक्र ग्रह नाराज होतात आणि त्यांचा वाईट प्रभाव आपल्यावर पडत असतो शिवाय पांढऱ्या पदार्थावरून करणी केली जाते त्यामुळे सायंकाळी हे पदार्थ देणे आवर्जून टाळावेत.

 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts