आरोग्य : गरम पाणी पिण्याने होणारे तोटे माहित नसेल तर लगेच जाणून घ्या !

आपल्याला नेहमी सांगितलं जाते गरम पाणी पिण्याचे शरीराला अनेक फायदे होत असतात. मात्र, काही प्रमाणात त्याचे तोटेही होतात.
गरम पाणी पिल्याने शरीरातील अनेक विकार दुर होऊ शकतात. दिवसभर गरम पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते. तणाव कमी होण्यास मदत होते. तुमची पचनक्रिया देखील सुधारते. हे सगळे फायदे गरम पाणी पिल्याने होतात मात्र त्याचे काही तोटेही आहेत जे आपण लक्षात घ्यायला पाहिजेत.

सर्वप्रथम  जाणून घ्या गरम पाणी पिल्याने होणारे फायदे : 

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम : 

दिवसभर कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ राहते यामुळे अपचन आणि अॅसिडिटीची समस्या उद्भवत नाही. इतकेच नाही तर गरम पाण्याने पोटदुखी आणि पोटदुखीची समस्याही दूर केली जाऊ शकते.

वजन कमी करण्यास फायदेशीर : 

गरम पाण्याच्या नियमित सेवनाने तुमची अन्न पचवण्याची क्षमता वाढते . जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर गरम पाणी नक्की प्यावे ज्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदा होईल, त्यामुळे तुमचे मन शांत राहील आणि जास्त भूकही लागणार नाही यामुळे तुमचे वजन आटोक्यात राहील.

त्वचेच्या समस्यांपासून सुटका : 

गरम पाणी प्यायल्याने तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.तसेच कोरडी त्वचा आणि सुरकुत्याची याची समस्या कमी होऊ शकते. वास्तविक गरम पाणी तुमच्या त्वचेतील रक्ताभिसरण सुधार करण्यास मदत करते. तुमचे चेहऱ्यवरील मुरूम कमी करण्यास गरम पाणी उपयुक्त ठरते.

गरम पाणी पिण्याचे तोटे : 
दिवसभर जास्त गरम पाणी पिल्याने तुमच्या किडनीवर ताण येऊ शकतो. खरं तर, मूत्रपिंड शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. पण  मात्र  जास्त गरम पाणी प्यायल्याने तुमच्या किडनीवर ताण येऊ शकतो आणि  किडनीसंबधीत रोग होऊ शकतात.

 

मराठी Shout: मराठीShout Publication - No.1 Marathi News And Entertainment Blogs Media
Recent Posts