पावसाळ्यात खा ही पाच फळे, आजार होतील कायमचे बरे !

सध्या पावसाळा सुरू आहे. आणि पावसाळा म्हटलं की त्यात चिंब होऊन भिजले नाही असं होणार नाही. अशातच जर छान मुसळधार पाऊस असेल तर त्यात मनमुराद भिजल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही.

आपण अनेकदा वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतो हे आपल्या लक्षातच येत नाही. पावसाळ्यात पुष्कळदा वातावरण थंड देखील असते. त्यामुळे पावसात भिजल्यावर थंडी लागून ताप येणं साहजिकच आहे.

शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आपल्याला पावसाळ्यातल्या फळांचा उपयोग करून आपण निरोगी राहू शकतो.

तर बघुया ती नेमकी कोणती फळे आहेत जी पावसाळ्यात आरोग्यवर्धक आहेत.

आलूबुखारा हे एक स्वादिष्ट आणि चविष्ट असे फळ आहे. पावसाळ्यात इंफेक्शन आणि पोटाशी संबंधित तक्रारींपासून दूर राहण्यासाठी याचे सेवन अवश्य करावे. रोज आलूबुखारा खाल्ल्याने इम्यून सिस्टम मजबूत होतो.

आलूबुखारा ( Plum )

पावसाळ्यात जांभूळ पिकायला सुरुवात होते, त्यामुळे त्याचे सेवन करणे शरीरासाठी खूपच फायद्याचे मानले जाते. जांभळात आयर्न, पोटॅशिअम, फोलेट आणि व्हिटामिन ची योग्य मात्रा असते.

जांभूळ

चेरी हे एक असे फळ आहे, ज्याचे पावसाळ्यात सेवन करणे खूपच फायद्याचे मानले जाते. व्हिटामिन ए,बी, सी, बीटा कैरोटीन, कॅल्शिअम, आयर्न आणि पोटॅशिअम युक्त असे हे फळ आहे.

चेरी ( Cherry )

फायबरयुक्त असलेले नास्पती हे फळ खूपच गोड आणि मधूर असे फळ आहे. याने मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले होते. यात अँटी ऑक्सीडेंट्स मात्रा जास्त असते. त्यामुळे तुम्ही जर आपले वजन कमी करु इच्छिता तर नास्पतीचे सेवन अवश्य करा.

नास्पती ( Pear )

पावसाळ्यात आजारापासून बचाव करण्यासाठी रोज डाळिंब खाल्ले पाहिजे. फायबर आणि व्हिटामिन ने युक्त असलेल्या डाळिंबाचे सेवन तसे वर्षभर करता येते मात्र पावसाळ्यात डाळिंबाचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित काही तक्रारी असतील तर दूर होतात.

डाळिंब ( Pomegranate )

आणखी माहिती बघण्याकरिता वेबसाइट ओपन करा.