‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम वैशाली ठक्करने केली आत्महत्या. सोबत सापडली एक सुसाईड नोट.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता अशीच एक घटना समोर आली आहे. आधीच्या बॉयफ्रेडकडून छळ होत असल्याने वैशाली ठक्करने सुसाईड केल्याचं समोर आलं आहे. खरंतर आज टीव्ही विश्वात खळबळ उडाली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम वैशाली ठक्करच्या आत्महत्येच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. वैशालीने अचानक हे पाऊल कसे उचलले हे त्याच्या जवळच्या लोकांना समजू शकलेले नाही. अभिनेत्रीने आपल्या इंदोरच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीने सुसाईड नोटसुद्धा लिहली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली  टक्कर गेल्या एक वर्षांपासून इंदोरमध्ये राहात होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येची माहिती समोर येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना वैशालीच्या मृतदेहा शेजारी सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे. आता त्या नोटमधून तिच्या मृत्यूचं खरं  कारण समोर आलं  आहे.अभिनेत्री फक्त २९ वर्षांची होती. तिच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले. घटनास्थळावर पोलिसांनी एक सुसाईड नोटही जप्त केली. ज्यामध्ये तिने स्पष्ट लिहिलं आहे की तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला खूप त्रास देत होता. आता या प्रकरणात शेजाऱ्याचंही नाव असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

 

टीव्ही अभिनेत्री वैशाली टक्कर हिच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी एमवाय हॉस्पिटलमध्ये पाठवला. मृत अभिनेत्रीकडून पोलिसांना एक वैयक्तिक डायरीही सापडली असून, त्यातून तिने आत्महत्या का केली त्याच कारण समजत आहे.

 

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि त्यानंतर अभिनेत्रीवर अंत्यसंस्कार करण्यात आले पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये  बॉयफ्रेंडने धोका दिल्यामुळेच वैशालीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, चौकशीनंतरच त्याबाबतचा खुलासा होणार आहे. तिच्याकडे मिळालेल्या चिठ्ठीवरून तिचं कुणाशी तरी प्रेमप्रकरण सुरू असल्याचं दिसून येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. प्रेम प्रकरणात अपयश आल्याने तिने आत्महत्या केली असावी असं सांगितलं जात आहे.

 

वैशाली मध्यप्रदेशाची राजधानी इंदौर येथे राहत होती. सात वर्ष मायानगरी मुंबईत राहिल्यानंतर गेल्यावर्षी ती इंदौरमध्ये येऊन राहत होती. तिचं शिक्षणही इंदौरच्या शाळा आणि महाविद्यालयात झालं होतं. तिने आतापर्यंत  मनमोहिनी, सुपर सिस्टर्स, विष और अमृत आदी सुपरहीट मालिकांमध्ये तिने काम केलं होतं. गेल्यावर्षी तिचा डॉ. अभिनंदन सिंह यांच्याशी साखरपुडा झाला होता. पण त्यांचं हे नातं अधिककाळ चाललं नाही. त्यामुळे त्यांनी साखरपुडा मोडला होता. नैराश्याचे कारणही तिने आपल्या पर्सनल डायरीमध्ये लिहून ठेवल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. 

प्रिया गोमाशे: नमस्कार, मी प्रिया गोमाशे मला लेखनाची आवड असल्यामुळे विविध विषयांवर आणि घडामोडींवर लेख लिहते.
Recent Posts