• About
  • Contcat Us
  • Advertise
Friday, May 10, 2024
Marathi Shout
No Result
View All Result
  • ठळक बातम्या
    Karnataka Raj bhavan receives bomb threat call search ops underway

    BREAKING NEWS: कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवण्याची धमकी; यंत्रणेचा तपास सुरू

    mumbai Nagpur Samrudhi Mahamarg

    समृद्धी महामार्ग करेल का समृद्ध ? ही आहेत समृद्धीची वैशिष्ट्ये. नक्की वाचा.

    Actress Alia Bhatt and actor Ranbir Kapoor received Kanya Ratna. (1)

    अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला कन्यारत्न प्राप्त झाले.

    vaishali thakkar

    ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम वैशाली ठक्करने केली आत्महत्या. सोबत सापडली एक सुसाईड नोट.

    RAJU SRIVASTAV (1)

    कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव कालवश..

    मोबाईल गेम च्या वेडापायी केला स्वतःच्या आई चा खुन…बहिणीला ही खोलीत कोंडून ठेवलं.

    मोबाईल गेम च्या वेडापायी केला स्वतःच्या आई चा खुन…बहिणीला ही खोलीत कोंडून ठेवलं.

    Trending Tags

    • Commentary
    • Featured
    • Event
    • Editorial
  • मनोरंजन
    • जरा हटके
    • व्हायरल
  • मराठी तडका
    • व्हायरल
    • बॉलीवूड
    • तंत्रज्ञान
    • जरा हटके
  • भारत
  • जागतिक
  • बॉलीवूड
  • ब्लॉग
  • उद्योग-व्यवसाय
  • औद्योगिक
  • आर्थिक
    • गुंतवणूक
  • तंत्रज्ञान
    • टेक
  • आरोग्य
  • व्हायरल
    Samantha prabhu production house

    अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेअर केली गुडन्यूज : चाहत्यांनी दिल्या भरपूर शुभेच्छा !

    Actress Samantha has myositis disease. Know what exactly this disease is.

    अभिनेत्री समंथाला झालाय मायोसिटिस आजार. हा आजार नेमका कोणता, जाणून घ्या.

    delhi auto-driver_ made garden on roof of auto

    ऑटोरिक्षा वाल्याची कमाल, रिक्षचालकाने रिक्षाच्या छतावर फुलविली बाग…

    Viral Chapati video

    गॅस, चुली महागाईने परवडत नाही , काळजी नको आता उन्हाने फुकट करा स्वयंपाक ! Women cooks food in cars bonnet

    viral stories

    एका मुलाला “गर्ल रूममेट” हवी पण या आहेत अटी…

    Aurangabad news

    अजब नवसाचा गजब प्रकार… कसा फेडू देवा तुझा नवस?

    Petrol as a marriage gift video

    मित्र लग्नाला आले, तेही पेट्रोल आणि डिझेल च्या बाटल्या घेऊन, जाणून घ्या ” अजब लग्नाचा गजब प्रकार “आहे हा प्रकार…

    Trending Story inida

    विमानातील हरविलेल्या लगेज ला शोधण्यासाठी इंजिनियर ने केले विमान कंपनी ला हॅक!!!

    RPF Viral Video

    रेल्वे खाली येऊनही जीव वाचला!!! बघा RPF ने शेअर केलेला व्हयरल विडिओ

    Trending Tags

    • Visual Stories
    • जीवनशैली
    • विशेष
    • इतर
      • सिनेमा
      • विज्ञान
      • शेती
      • फॅशन
      • क्रिकेट
      • अन्न-पदार्थ
      • इतिहास आणि संस्कृती
    • ठळक बातम्या
      Karnataka Raj bhavan receives bomb threat call search ops underway

      BREAKING NEWS: कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवण्याची धमकी; यंत्रणेचा तपास सुरू

      mumbai Nagpur Samrudhi Mahamarg

      समृद्धी महामार्ग करेल का समृद्ध ? ही आहेत समृद्धीची वैशिष्ट्ये. नक्की वाचा.

      Actress Alia Bhatt and actor Ranbir Kapoor received Kanya Ratna. (1)

      अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला कन्यारत्न प्राप्त झाले.

      vaishali thakkar

      ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम वैशाली ठक्करने केली आत्महत्या. सोबत सापडली एक सुसाईड नोट.

      RAJU SRIVASTAV (1)

      कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव कालवश..

      मोबाईल गेम च्या वेडापायी केला स्वतःच्या आई चा खुन…बहिणीला ही खोलीत कोंडून ठेवलं.

      मोबाईल गेम च्या वेडापायी केला स्वतःच्या आई चा खुन…बहिणीला ही खोलीत कोंडून ठेवलं.

      Trending Tags

      • Commentary
      • Featured
      • Event
      • Editorial
    • मनोरंजन
      • जरा हटके
      • व्हायरल
    • मराठी तडका
      • व्हायरल
      • बॉलीवूड
      • तंत्रज्ञान
      • जरा हटके
    • भारत
    • जागतिक
    • बॉलीवूड
    • ब्लॉग
    • उद्योग-व्यवसाय
    • औद्योगिक
    • आर्थिक
      • गुंतवणूक
    • तंत्रज्ञान
      • टेक
    • आरोग्य
    • व्हायरल
      Samantha prabhu production house

      अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेअर केली गुडन्यूज : चाहत्यांनी दिल्या भरपूर शुभेच्छा !

      Actress Samantha has myositis disease. Know what exactly this disease is.

      अभिनेत्री समंथाला झालाय मायोसिटिस आजार. हा आजार नेमका कोणता, जाणून घ्या.

      delhi auto-driver_ made garden on roof of auto

      ऑटोरिक्षा वाल्याची कमाल, रिक्षचालकाने रिक्षाच्या छतावर फुलविली बाग…

      Viral Chapati video

      गॅस, चुली महागाईने परवडत नाही , काळजी नको आता उन्हाने फुकट करा स्वयंपाक ! Women cooks food in cars bonnet

      viral stories

      एका मुलाला “गर्ल रूममेट” हवी पण या आहेत अटी…

      Aurangabad news

      अजब नवसाचा गजब प्रकार… कसा फेडू देवा तुझा नवस?

      Petrol as a marriage gift video

      मित्र लग्नाला आले, तेही पेट्रोल आणि डिझेल च्या बाटल्या घेऊन, जाणून घ्या ” अजब लग्नाचा गजब प्रकार “आहे हा प्रकार…

      Trending Story inida

      विमानातील हरविलेल्या लगेज ला शोधण्यासाठी इंजिनियर ने केले विमान कंपनी ला हॅक!!!

      RPF Viral Video

      रेल्वे खाली येऊनही जीव वाचला!!! बघा RPF ने शेअर केलेला व्हयरल विडिओ

      Trending Tags

      • Visual Stories
      • जीवनशैली
      • विशेष
      • इतर
        • सिनेमा
        • विज्ञान
        • शेती
        • फॅशन
        • क्रिकेट
        • अन्न-पदार्थ
        • इतिहास आणि संस्कृती
      No Result
      View All Result
      Morning News
      No Result
      View All Result
      Home ब्लॉग

      स्त्रिया , शेतकरी आणि कामगार यांचे विसरलेले उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर  

      Editorial Team by Editorial Team
      April 14, 2022
      in ब्लॉग, विशेष
      Babasaheb Ambedkar 14 april

      image credit: @bakeryprasad

      316
      SHARES
      1.1k
      VIEWS
      Share on FacebookShare on Twittershare on Whatsapp

      १४ एप्रिल जयंती विशेष : भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.जातीय भेदभावामुळे भारतीय समाज पूर्णपणे अपंग बनलेला होता. अश्या वेळेस बाबासाहेब आंबेडकर एक मसीहा बनून दलितांच्या हक्कासाठी संघर्ष केला त्यामुळे बर्याच प्रमाणात सामाजिक परिस्थिती बदलली.

       

      शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!! 

      Babasaheb Ambedkar famous quotes
      Image Credit : @bakeryprasad

      डॉ.आंबेडकर आणि विदेशातील शिक्षण | Dr. Babasaheb Ambedkar Education 

      बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.

      आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते. त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५०च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.

      Babasaheb Ambedkar Thoughts : 

       

      ” बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे ” .— डॉ बाबासाहेब आंबेडकर.

      कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला. त्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि जोडीला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करून विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी झाले.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कृषी व शेती संबंधीचे विचार:

      शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला तर शेतमजूर आणि शेतीशी निगडित सर्वच घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल. शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्याला शाश्वत पाणी मिळणे गरजेचे आहे.शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोऱ्यांची विभागणी केली. यावरून डॉ. बाबासाहेब यांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते.

      आजही शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या. शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनविले. यामागे डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांचाच प्रभाव दिसून येतो. डॉ. बाबासाहेब यांचे शेतीबाबतचे विचारधन राज्यकर्ते नियोजनकार व शेती तज्ज्ञांनी अभ्यासले पाहिजेत.

      ” स्त्रियांनी जी प्रगती केली आहे तिच्या पदवीनुसार मी त्यानुसार समुदायाच्या प्रगतीचे मापन करतो.” — डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचे पक्के समर्थक:

      Womens right work babasaheb ambedkar
      Image Credit : @bakeryprasad

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. बाबासाहेबांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याचे आद्य पुरस्कर्ते होत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अभ्यासक डॉक्टर रूपा कुलकर्णी-बोधी यांच्या मते, ‘भारतीय स्त्रीमुक्तीची खरी वैचारिक बैठक भगवान बुद्धांच्या भक्कम अशा समतावादी तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहे, बाहेरून आयात केलेल्या एखाद्या जेंडर बेस्ड विचारावर नाही! आणि कायद्याएवढेच बाबासाहेबांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी दिलेली ही शुद्ध भारतीय बैठक!’

      खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि २० वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्तिवेतनाची तरतूद यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करायला हवा. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत, भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत.

      बाबासाहेबांनी १९४७ मध्ये कायदे मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबंधातली स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसाहक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्त्वांचा यात समावेश होता.

      बाबासाहेबांनी आपल्या चळवळीत स्त्रियांना आवर्जून सहभागी करून घेतले. १९२७चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, १९३०चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह व १९४२च्या नागपुरातल्या महिला परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लग्न ही मुलीच्या प्रगतीमधली अडचण असून मुलीवर ते लादले जाऊ नये, “लग्नानंतर पत्नी ही नवऱ्याची मैत्रीण व समान अधिकार असलेली सहचारिणी असायला हवी. ती नवऱ्याची गुलाम व्हायला नको.” असे ते म्हणत. बायको कशी असावी, याबाबत पुरुषाचे मत घेतले जाते, तद्वतच स्त्रीचेही नवऱ्याविषयीचे मत, आवडी-निवडी विचारत घेतल्या पाहिजेत.

      “आम्ही पहिले आणि शेवटी एक भारतीय आहोत.” — डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

       

      भारतीय रिझर्व बँके मध्ये बाबासाहेबांचे योगदान:

      सन १९३५ साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या. अर्थशास्त्रामध्ये परदेशात डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचे समर्थन केले. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, समुदाय स्वास्थ्य, निवासी सुविधांना मूलभूत सुविधा म्हणून जोर दिला. त्यांनी ब्रिटिश शासनामुळे होणाऱ्या विकासाच्या नुकसानाची गणना केली.आपल्या ‘‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’‘ या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर आंबेडकरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत. स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी सुवर्ण विनिमय परिमाण (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड) अमलात आणावे, अशी शिफारस आंबेडकरांनी केली.

      स्वदेशी-विदेशी मालाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार :

      “स्वदेशी माल उत्पन्न करून हा दरिद्री देश सधन होईल अशी प्रवचने सांगणाऱ्या तारवठलेल्या स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांनी लक्षात घ्यायला हवे की, परदेशी माल आयात होतो याचे कारण तो कमी किमतीत मिळतो. तसाच माल स्वदेशात उत्पन्न होत नाही. याचे कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापारात परदेशी मालापुढे त्याचा टिकाव लागत नाही. त्याचा टिकाव लागावा म्हणून परदेशी मालास अटकाव करा, या महामंत्राचा जप चालला आहे. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकांस अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणे भाग पडेल याचा विचार करावा कोणी? असे केल्याने देशाचे कल्याण होईल, असे म्हणण्याऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल. कारण अनियंत्रित व्यापार पद्धतीत मिळत असलेला स्वल्प भावाचा माल नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरीबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहे. यात त्यांची होणारी नागवण ‘स्वदेशी’ या लाडक्या शब्दाने भरून निघेल असे मानून ते समाधान पावतील असे संभवत नाही. सुसंपन्नतेचा हा स्वदेशी मार्ग त्यांना भोवेल.”-डॉ. बाबासाहेब आंबेडकर (‘मूकनायक’ या नियतकालिकात २८ फेब्रुवारी १९२० ).

      काश्मीर समस्येवरील मार्ग दर्शक डॉ. बाबासाहेब आंबेडकर:

      Babasaheb Ambedkar thoughts on kashmir
      Image Credit : @bakeryprasad

      आंबेडकरांनी असा विचार मांडला की, ज्याप्रमाणे भारताची फाळणी करताना हिंदू बहुसंख्य भाग भारताकडे ठेवला आणि मुस्लिम बहुसंख्य भाग पाकिस्तानला दिला, त्याप्रमाणे हिंदू बहुसंख्य व बौद्ध बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग भारताला घ्यावा आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग पाकिस्तानला द्यावा. वाटल्यास युद्धबंदी भाग, काश्मिर खोरे आणि जम्मू-लडाख असे काश्मिरचे तीन भाग करावेत व त्या तिन्ही भागांत स्वतंत्रपणे सार्वत्रिक मतदान घेऊन घेऊन निर्णय करण्यात यावा. काश्मिरचे तीन भाग करून तीन भागात स्वतंत्रपणे सार्वमत घेण्याऐवजी जर संपूर्ण काश्मिरमध्ये सार्वमत घेण्यात आले तर काश्मिरमधील हिंदूंना व बौद्धांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिमांबरोबर पाकिस्तानात जावे लागेल आणि त्यांना पूर्व बंगालमधील हिंदूंप्रमाणे असह्य त्रास सहन करावा लागेल.

       

      ‘व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या इंग्रजी पुस्तकानुसार, जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा देण्यास डॉ. आंबेडकरांचा विरोध होता. आरएसएसचे माजी प्रचारक बलराज मधोक यांच्यानुसार, जम्मू व काश्मिरच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी काश्मिरी नेता शेख अब्दुल्ला यांना सांगितले होते की, “भारताने काश्मीरच्या सीमेचे रक्षण करावे, तेथील रस्ते तयार करावे, काश्मीरला अन्नपुरवठा पुरवठा करावा तसेच भारताच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, अशी जर तुमची इच्छा असेल तर माझा कलम ३७० ला विरोध आहे. तसेच भारत सरकारकडे काश्मीरबद्दल मर्यादीत अधिकार असावे आणि भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये कोणतेच अधिकार नसावे. जर तुम्ही अशा प्रस्तावावर माझी मंजुरी घेत असाल तर मी भारताचा कायदा मंत्री म्हणून या प्रस्तावाला कधीच मान्यता देणार नाही.”

      बाबासाहेब आंबेडकर यांचा “भारतीय संविधान” निर्मितीत सिंहा चा वाटा:

      Father of Indian Constitution
      Image Credit : @bakeryprasad

      संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे सदस्य टी.टी. कृष्णमचारी यांनी सांगितले की,”संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक सदस्य अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बरेच लांब होते आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की, संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले. कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी. डॉ. आंबेडकरांनी ही जबाबदारी, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पडले, यात मला तीळमात्रही शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत.” एस. नागप्पा म्हणाले की, “या घटनेचा मुसदा तयार करण्याचे कष्ट घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी डॉ. आंबेडकर यांचे आभार मानतो. हे काम गुंतागुंतीचे आहे, याविषयी शंकाच नाही, तरी सुद्धा त्यांनी ते अतिशय यशस्वीपणे व कमी वेळेत केले.”

      धन्य आपली भारतभूमी जिने अश्या पुत्राला जन्माला घातले आपल्या देशाला एकसंध राष्ट्र ठेवण्यासाठी या महामानवाच्या प्रयत्नांचे कौतुक फार आहे. आपणही आपला भारत धर्म वाढवूया, जाती तोडूया, धर्म आणि राजकारण यांचा होणारा मेळ तोडूया आणि आपल्या देशाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या प्रगती पथावर घेऊन जाऊया. वरील माहिती अनेक पुस्तकातून संकलित केली आहे, काही चुका आढळल्यास आम्हाला कळवा. भारतीय महापुरुषांचे जीवन आणि माहिती नसलेले कार्य माहिती करून घेण्यासाठी आपल्या “मराठी Shout” ला, लगेच Instagram आणि Facebook वरती फॉलो करा, महापुरुषांच्या आयुष्यातील माहिती नसलेल्या विभिन्न घडामोडी जाणुन घ्या.

      लेखक :
      – मयूर मेश्राम, नागपूर 

      Editorial Team

      Editorial Team

      Editorial Team By MarathiShout Publication

      Related Posts

      Sidhutai Sapkal Biography
      विशेष

      सिंधूताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती | Biography of Sindhutai Sapkal

      February 23, 2024
      Jyotiba Phule Autobiography In marathi
      ब्लॉग

      महात्मा ज्योतिबा फुले यांचे आत्मचरित्र | Jyotirao Phule Autobiography

      February 23, 2024
      Savitribai phule biography in marathi
      लेख

      क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र | Savitribai Phule information in marathi

      January 6, 2024
      प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधान का वाचावे ?
      भारत

      प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधान का वाचावे ?

      December 22, 2022
      students of class 10th and 12th
      महाराष्ट्र नूज

      दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘हा’ नियम आहे महत्वाचा ! नक्की वाचा.

      November 3, 2022
      Importatnce of Dhanteras
      इतिहास आणि संस्कृती

      धनत्रयोदशीचे खास महत्व जाणून घ्या. आणि करा ‘याप्रमाणे’ पूजा.

      February 23, 2024
      Next Post
      lemon price hike in April 2022

      लिंबू एवढं महाग जाणून घ्या काय आहे कारण

      Advertisement




      Visual Stories

      अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेअर केली गुडन्यूज, जाणून घ्या सविस्तर !
      अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेअर केली गुडन्यूज, जाणून घ्या सविस्तर !
      गरम पाणी पिण्याने होणारे तोटे माहित नसेल तर लगेच जाणून घ्या !
      गरम पाणी पिण्याने होणारे तोटे माहित नसेल तर लगेच जाणून घ्या !
      तुमचं Facebook अकाउंट झालं हॅक ? मग असं करा पुन्हा रिकव्हर
      तुमचं Facebook अकाउंट झालं हॅक ? मग असं करा पुन्हा रिकव्हर
      त्वचा उजळविण्यास हे ड्रायफ्रूट्स आहेत वरदान.
      त्वचा उजळविण्यास हे ड्रायफ्रूट्स आहेत वरदान.
      टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, असा असणार संघ?
      टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, असा असणार संघ?

      About Us

      मराठी Shout - Marathi News And Entertainment Media |
      देशातल्या , जगभरातल्या आणि महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्या, विश्लेषण आणि गमतीशीर गोष्टी.

      Follow Us

      Categories

      • Dream 11 Fantasy
      • Editorial
      • Female Health
      • Sexual Health
      • अन्न-पदार्थ
      • आरोग्य
      • आर्थिक
      • आशिया कप २०२२
      • इतर
      • इतिहास आणि संस्कृती
      • उद्योग-व्यवसाय
      • औद्योगिक
      • क्रिकेट
      • गुंतवणूक
      • जरा हटके
      • जागतिक
      • जीवनशैली
      • जॉब्स
      • टी २० विश्वचषक २०२२
      • टेक
      • तंत्रज्ञान
      • फॅशन
      • फोटो गॅलरी
      • बातम्या
      • बॉलीवूड
      • ब्लॉग
      • भारत
      • मनोरंजन
      • मराठी तडका
      • महाराष्ट्र नूज
      • लेख
      • विज्ञान
      • विशेष
      • व्हायरल
      • शेअर मार्केट
      • शेती
      • सिनेमा
      • स्पोर्ट्स

      Recent Post

      • सिंधूताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती | Biography of Sindhutai Sapkal
      • महात्मा ज्योतिबा फुले यांचे आत्मचरित्र | Jyotirao Phule Autobiography
      • सावधान ! दागिने न घालणाऱ्या स्त्रियांना होऊ शकतात हे आजार. लगेच जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण.
      • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र | Savitribai Phule information in marathi
      • अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेअर केली गुडन्यूज : चाहत्यांनी दिल्या भरपूर शुभेच्छा !

      Site Information

      • Home
      • Web Stories
      • About Us
      • Contact
      • Advertise
      • Privacy Policy
      • Disclaimer
      • Sitemap
      • RSS
      • About us
      • Advertise
      • Disclaimer
      • Home
      • Privacy Policy
      • videos
      • visual stories

      Copyright © 2020 by marathishout.com - All Right Reserved.

      No Result
      View All Result
      • मुख्य पृष्ठ
      • बातम्या
      • व्हायरल
      • मनोरंजन
      • भारत
      • जागतिक
      • बॉलीवूड
      • ब्लॉग
      • उद्योग-व्यवसाय
      • आरोग्य
      • टेक
      • Visual Stories
      • विशेष
      • इतर
        • आर्थिक
        • सिनेमा
        • विज्ञान
        • मराठी तडका
        • अन्न-पदार्थ
        • जीवनशैली
        • फॅशन
        • लेख / निबंध
        • इतिहास आणि संस्कृती

      Copyright © 2020 by marathishout.com - All Right Reserved.

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In
      This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
      अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेअर केली गुडन्यूज, जाणून घ्या सविस्तर ! गरम पाणी पिण्याने होणारे तोटे माहित नसेल तर लगेच जाणून घ्या ! तुमचं Facebook अकाउंट झालं हॅक ? मग असं करा पुन्हा रिकव्हर त्वचा उजळविण्यास हे ड्रायफ्रूट्स आहेत वरदान. टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, असा असणार संघ?